Tag sugar industry news and updates

शून्य टक्के *मिल बंद तास* संकल्पना राबवा : आहेर

WR Aher Newasa,

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ वाळू आहेर यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी शून्य टक्के ‘मिल बंद तास’ ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त साखर उद्योगातील अधिकारी आणि कामगारांसाठी सोमवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वाळू आहेर यांनी शुन्य टक्के मिल बंद तास व साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन,मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील,…

दिलीप पाटील : वाढदिवस विशेष

Dilip Patil Birthday

दिलीप शिवदास पाटील हे साखर, इथेनॉल आणि बायो-CBG (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेले एक दूरदृष्टीचे आणि परिवर्तनकारी नेते आहेत. ते सहकारी साखर कारखाने आणि नूतनीकरणीय ऊर्जा उपक्रमांना पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा २७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त… धोरण…

निरोगी आयुष्यासाठी निसर्गाशी नाते जोडा – बीजमाता राहीबाई पोपेरे

Mangesh Titkare at MCDC kisan divas with Rahibai Papere

पुणे: आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरनामे सभागृह (कृषी महाविद्यालय) येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस (National Women Farmer’s Day) उत्साहात संपन्न झाला. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा…

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

Babasaheb Patil, Cooperation Minister

“शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हे वक्तव्य राज्यातील बळीराजाच्या स्वाभिमानाला आणि त्याच्या अस्तित्वाला दिलेला थेट आव्हान आहे. ज्या शेतकऱ्याच्या मतांवर निवडून येऊन सत्तेची ऊब अनुभवता, त्याच अन्नदात्याला अशा तुच्छतेने हिणवणे, हा सत्तेचा माज नाही तर…

प्रति टन २००० हजारांची चोरी; पवार, शेट्टी जबाबदार

Raju Shetti, Sharad Pawar, Raghunath dada Patil

रघुनाथदादा पाटील यांचा खळबळजनक आरोप, १२ ऑक्टोबरला ऊस, कांदा परिषद पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रति टन २००० रूपये चोरीस जात असून, त्यास ज्येष्ठ नेते शरद पवार अणि ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी हेच जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे…

डॉ. संजय कोलते नवे साखर आयुक्त

Dr. Sanjay Kolate is new Sugar Commissioner

मुंबई : राज्याचे नवे साखर आयुक्त म्हणून सरकारने मंगळवारी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती केली. त्यांची दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली होती. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) २०१० बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. संजय कोलते यांची…

डिस्टिलर्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळावर डॉ. राहुल कदम यांची नियुक्ती

Dr. Rahul Kadam, CMD Udagiri Sugar

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे (Udagir Sugar & Power Ltd.) चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांची दी डिस्टिलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या (The Distillers’ Association of Maharashtra, Mumbai) च्या कार्यकारी मंडळात सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात…

दिलीप वारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त हृद्य सत्कार

Dilip Ware retirement

पुणे : साखर उद्योगाचा तब्बल चार दशकांचा अनुभव असणारे व्यक्तिमत्व, तसेच शुगर इंडस्ट्रीज परिवाराचे प्रमुख आधारस्तंभ श्री. दिलीप वारे हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा मोशी ग्रँड येथे आयोजित कार्यक्रमात हृद्य सत्कार करण्यात आला.…

नऊ लाख टन ऊस गाळपाचे श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे उद्दिष्ट

Shrinath Mhaskoba Sugar Boiler Pradipan

पुणे- गळीत हंगाम २०२५-२६ साठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून, कारखान्याने ९ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केले. २२ व्या गाळप हंगामाकरिता बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते…

गाळप हंगामाला १ नोव्हेंबरचा मुहूर्त

Sugarcane crushing season meeting

मुंबई : महाराष्ट्रातील ऊस गळीत २०२५-२६ येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कारखाने आणि शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक कारखान्यांचे बॉयलर आधीच पेटले आहेत. आजपर्यंत किती कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केले…

Select Language »