Tag sugar industry news

…अखेर ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

कर्नाटक सरकारकडून उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा बंगळूर : कर्नाटक राज्‍यात गेली आठ दिवसांपासून सुरू असलेल्‍या आंदोलनाला अखेर यश मिळाले. या आंदोलनाची दखल घेत कर्नाटक सरकारकडून ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली, त्‍यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी…

मी साखर कारखाना बोलतोय…

Bhaskar Ghule Article 12

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

निलंगा तालुक्यात शॉर्टसर्किटने ऊस जळाला; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

लातूर : विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटने उभ्या ऊस पिकांना आगी लागल्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहेत. निलंगा तालुक्यातील सावरी आणि बेलकंड येथील शेतातील उभा ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना घडली. यात तीन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.   पहिल्या…

आजरा कारखान्याची वाहने स्वाभिमानी संघटनेने रोखली

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने गतवर्षीची थकीत एफआरपी त्वरित शेतकऱ्यांन देण्यात यावी आणि चालू गाळप हंगामाच्या उसाची पहिली उचल ३ हजार ७५१ रुपये जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजरा टोल नाक्याजवळ कारखान्यांची वाहने अडवून वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकला ऊस

CM Agitation

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले असता, त्यांच्या ताफ्यावर शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी ऊस फेकण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी मुख्यमंत्री उजळाईवाडी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या  ताफ्यावर शेतकऱ्यांनी उसाच्या कांड्या टाकून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. त्यावेळी ऊस दरावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. तसेच एक कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री बाहेर पडत असताना  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने  ऊस दराचा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ऐनवेळी कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याने सुरक्षा रक्षकांसह सर्वांची पळापळ झाली. यावेळी त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पावसाच्या उघडीपमुळे ऊस गाळप हंगाम घेणार वेग

पुणे : राज्‍यात गेली सात महिने पावसाने धुमाकुळ घातला होता. सध्या पावसाने आता उघडीप दिली असल्याने राज्‍यातील ऊस गाळप हंगामास आता वेग येणार आहे. साखर आयुक्तालयस्तरावरून १४५ साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने ऑनलाईनद्वारे वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे कारखानेही वेगाने…

‘महा-सहकार’ त्रैमासिकाचे प्रकाशन

MCDC Tri Monthly Magazine Pune

मुंबई : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महा-सहकार’ या त्रैमासिकाचे प्रकाशन  महामंडळाचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्रैमासिकाचा हा पहिलाच अंक असून, तो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला समर्पित आहे. या निमित्ताने सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. मंत्रालयात मंगळवारी…

थकित एफआरपीप्रश्नी सात कारखान्यांना गाळप परवाना नाही

FRP of sugarcane

साखर आयुक्त ; कारखान्यांना निधी भरण्यासाठी मुदतवाढ पुणे :  राज्यातील साखर गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. थकित एफआरपी असणाऱ्या राज्यातील ७ साखर कारखान्यांना ऊसगाळप परवाना दिला जाणार नसल्याचे…

शून्य टक्के *मिल बंद तास* संकल्पना राबवा : आहेर

WR Aher Newasa,

नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अधिकारी व कामगारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ वाळू आहेर यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी शून्य टक्के ‘मिल बंद तास’ ही संकल्पना राबवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त साखर उद्योगातील अधिकारी आणि कामगारांसाठी सोमवार दि.२७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण शिबिरात साखर उद्योगातील ख्यातमान तंत्रज्ञ वाळू आहेर यांनी शुन्य टक्के मिल बंद तास व साखर उद्योगातील हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन,मेन्टेनन्स आणि सेफ्टी याविषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, शिवाजीराव कोलते, अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, तांत्रिक सल्लागार एस.डी. चौधरी, एम.एस.मुरकुटे, मुख्य अभियंता राहुल पाटील,…

जळगाव जिल्ह्यात तीन एकर ऊस जळून खाक

जळगाव :  वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे राज्यात शॉर्टसर्किटमुळे मागील काही दिवसांत उसाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना पुन्हा मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील तळोदा येथे घडली आहे. येथील विजयकुमार शेंडे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात ऊस लागवड केली…

Select Language »