Tag sugar industry news

भारताने सोमालियाला पाठवली सर्वाधिक साखर

Sugar Export

नवी दिल्ली : आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी भारताने सर्वाधिक ५१ हजार ५९६ टन साखर सोमालियाला पाठवली असून, आठ एप्रिलपर्यंत एकूण २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखरेचा…

यशवंत कारखाना प्रकरणी २३ एप्रिलला हायकोर्टात सुनावणी

Yashwant sugar factory

कारखाना बचाव कृती समितीकडून संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती, हायकोर्टात याचिका पुणे : यशवंत सह. साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला आव्हान देणाऱ्या कारखाना बचाव कृती समितीच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २३ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात…

साखर उताऱ्यात ‘कुंभी-कासारी’ राज्यात अव्वल, सह. कारखाने आघाडीवर

KUMBHI KASARI SSK

पुणे : गळीत हंगाम २०२४-२५ आटोपल्यात जमा असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १२.६८ टक्क्यांसह, साखर उताऱ्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर…

आ. अमल महाडिक – वाढदिवस शुभेच्छा

Amal Mahadik, MLA

कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार अमल महाडिक यांचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा! कोल्हापूर (दक्षिण)चे आमदार असलेले अमल महाडिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालकही आहेत. ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. साखर आणि…

भारतीय साखर उद्योगाचा भविष्यकाळ

Sugar Industry 2030

भारत आणि जगातील बदलते परिप्रेक्ष्य (२०३०) साखर उद्योग एक क्रांतिकारी टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक ग्राहक प्रवृत्ती, आणि शाश्वततेकडे झुकणारे धोरण हे एकत्र येत आहेत. २०३० पर्यंत साखर वापराच्या पद्धतींमध्ये मोठे बदल, ऊसशेतीतील नवकल्पना, आणि मूल्यवर्धित उपपदार्थांची निर्मिती…

कर्नाटकात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन :  मंत्री शिवानंद पाटील

Ethanol

बेळगाव : इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असून कार्बन डायऑक्साइडचे उत्पादन कमी करते. अशा हरित इंधनाला प्रोत्साहन देण्याची योजना राज्य सरकार योजना आखत असल्याची माहिती साखर व वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारचे हरित ऊर्जेचा वापर अनिवार्य करण्याचे…

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ बनवण्याच्या युनिट्सना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यापार्श्वभुमीवर संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी पुन्हा निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने…

सह्याद्री साखर कारखान्यावर पुन्हा बाळासाहेब पाटलांचीच सत्ता!

Sahyadri Sugar Election

कराड : तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखावर पुन्हा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता कायम राहिली आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सुमारे ८ हजार मताधिक्याने विजय मिळविल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा आनंदोत्सव…

Select Language »