ब्लॉग

१३९ साखर कारखान्यांकडे २,७६८ कोटींची एफआरपी थकीत

FRP of sugarcane

पुणे: साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांनी सन २०२५-२६ च्या गाळप हंगामाचा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचा ऊस दर थकबाकीचा (FRP Arrears) पाक्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, राज्यातील १९६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला असून, त्यापैकी १३९ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची…

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

करवीरमध्ये उसाला आग : २०० शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर

burned Sugarcane field

करवीर : गुरुवारी दुपारी १:३० च्या सुमारास वडकशिवाले येथील शिवारात आग लागल्याची दुर्घटना घडली. बाचणी रस्त्यावरील स्मशानभूमीपासून सुरू झालेली आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी उसाचा पट्टा तोडून आग थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत ११० एकर ऊस जळाला…

ऊसतोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक; १० जणांवर गुन्हा

सांगली : राज्‍यात सध्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. यासाठी मजुरांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कवठेपिरान येथील अनिकेत वडगावे या तरुण शेतकऱ्याला जळगावच्या एका टोळीने सव्वा सहा लाखांचा चुना लावला आहे. अनिकेत वडगावे यांनी संशयित १० जणांविरोधात सांगली…

कारखान्यांच्या गाळप परवाना शुल्कास स्थगिती

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का पुणे : राज्य सरकारने २०२५-२६ च्या ऊस हंगामासाठी साखर कारखान्यांवर लादलेल्या अतिरिक्त शुल्क वसुलीस मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी, पूरग्रस्त मदत आणि ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी प्रति टन २५ रुपये शुल्क…

साखर कारखान्यात मृत्यूचे तांडव: उकळत्या मळीने ७ कामगारांचा बळी

मुरकुंबी : बेळगाव जिल्ह्यातील मुरकुंबी येथील इनामदार साखर कारखान्यात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास काळाने घाला घातला. ‘एव्हीसीपी क्रमांक १’ च्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करत असताना अचानक बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे बाहेर पडलेली अतिउष्ण मळी कामगारांच्या अंगावर पसरली. या भीषण आगीत…

‘महा -सहकार’चे प्रकाशन

Mangesh Titkare

पुणे – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकरे यांनी ‘यशदा’च्या कार्यालयात जाऊन अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक शेखर गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली आणि महामंडळाच्या ‘महा -सहकार’ या त्रैमसिकाचे प्रकाशनही केल.. यावेळी त्यांच्या सोबत…

डॉ.सरोजिनी बाबर

Sarojini Babar

आज बुधवार, , जानेवारी ७, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १७, शके १९४७सूर्योदय : ०७:१४सूर्यास्त : १८:१६चंद्रोदय : २२:१९चंद्रास्त : १०:१९शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष : कृष्ण…

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

RAJU SHETTI

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे

SugarToday Daily Panchang

आज सोमवार, जानेवारी ५, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १५, शके १९४७सूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:१५चंद्रोदय : २०:२४ चंद्रास्त : ०८:५५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष :…

कर्जाचा दुरूपयोग केल्याचा २१ साखर कारखान्यांवर ठपका

NCDC

मुंबई: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कारखान्यांना कर्ज दिले होते. मात्र ३३ पैकी २१ सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाचा विनियोग वेगळ्याच कारणासाठी करून गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अन्य तीन कारखान्यांनी काही प्रमाणात उल्लंघन केल्याचे…

A Global Torchbearer of Digital Transformation in the Sugar Industry

Rajendra Gangarde, Founder- Vishwaguru Infotech

I recently had the opportunity to speak at a state-level conference jointly organized by the Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil Chair of Cooperation and the Department of Commerce, Savitribai Phule Pune University, on the theme “Economic Pathways for the…

साखर कारखान्यांच्या डिजिटायझेशनचा *विश्वगुरू*

Vishwaguru Infotech Pune, all IT solutions

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय परिषद साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा या विषयावर नुकतीच बोलण्याची संधी मिळाली. हा माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर हृदयाला स्पर्श करणारा…

सरासरी ८.७५ टक्के उताऱ्याने ४९ लाख टन साखर उत्पादन

Sugar Production

राज्यातील ५६२ लाख टन ऊसाचे गाळप पूर्णअहिल्यानगर/सुखदेव फुलारीमहाराष्ट्र राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालया तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९७ सहकारी व ९८ खाजगी अशा एकूण १९५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात ३१ डिसेंबर २०२५ अखेर एकूण…

ऊसतोड मजुरांच्या झोपड्या जळून खाक; अडीच लाखांचे नुकसान

सांगली(वाळवा) : वाळवा तालुक्यातील शिगाव येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या वस्तीला शुक्रवारी भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, मजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने, सर्व मजूर ऊसतोडीसाठी शेतात गेलेले असल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीमध्ये मजुरांचे…

माणगंगा कारखान्यात चोरीचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकावर हल्ला

सांगली : आटपाडी तालुक्यातील सोनारसिद्धनगर येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्यात २७ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरीचा मोठा प्रयत्न उघडकीस आला आहे. चोरट्यांनी कारखान्यातील सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरून नेण्याचा प्रयत्न केला, तसेच यावेळी सुरक्षा रक्षकावर हल्लाही केला. आटपाडी पोलिसांनी तातडीने…

राजकारण बाजूला ठेवून जपली माणुसकी! ऊसतोड कामगारांना सभापतींचा आधार

Helping Hand

पुणे/खेड: राजकारणात केवळ मतांचे गणित न पाहता माणुसकीला प्राधान्य देत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांनी एका ऊसतोड मजूर कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. खेड तालुक्यातील मरकळ येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बैल गमावलेल्या परजिल्ह्यातील मजुरांना शिंदे…

केन ॲग्रो कारखान्याकडून १८.८३ कोटींची थकबाकी वसूल

सांगली : कर्जवसुलीसाठी संघर्ष करणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कडेगाव येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लि. साखर कारखान्याने आपल्या थकीत कर्जाचा पहिला हप्ता १८ कोटी ८३ लाख रुपये व्याजासह बँकेत जमा केला आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT)…

गेवराईतील कृषीप्रदर्शन शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीचा मार्ग : बोत्रे-पाटील

Omkar Sugar Mills Group

गेवराई(बीड) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतीत उत्पादन वाढवावे आणि आर्थिक प्रगती साधावी, या उद्देशाने आयोजित केलेले कृषी प्रदर्शन अत्यंत स्तुत्य आहे. गेल्या १८ वर्षांच्या सातत्यामुळे या भागातील शेतीत मोठे सकारात्मक बदल झाले आहेत, असे प्रतिपादन ओंकार उद्योग…

हुतात्मा साखर कारखान्यामध्ये भरती

vsi jobs sugartoday

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यामध्ये साखर व आसवणी प्रकल्पासाठी खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. त्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन साखर कारखाना व ३० केएलपीडी डिस्टीलरी प्रकल्पामधील सदर…

ऊसतोडीसाठी आलेल्या परप्रांतीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक नराधमांनी अत्याचार केल्याची घटना माजलगाव ग्रामीण परिसरात  २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. या…

गुड न्यूज! साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल

sugar production increase

नवी दिल्ली : चालू गळीत हंगामात महाराष्ट्राने साखर उत्पादनात देशात आघाडी घेतली असून, ३१ डिसेंबर २०२५ अखेर राज्याने ४९ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. यंदा देशातील एकूण साखर उत्पादन तब्बल ३५० लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, उत्तर प्रदेश  हे ३५…

अरे माणसा माणसा

aher poem

अरे माणसा माणसा |जै डोंबारी तारेवर||तै समतोल नजर|मग मिळेल भाकर||१|| अरे माणसा माणसा|खोटं कधी बोलू नये||सुगरणीच्या घरट्याला|खोपा, कधी म्हणू नये||२|| अरे माणसा माणसा|निसर्गाची कला न्यारी||जरि शेंग ती काटेरी| सागरगोटे अंतरी||३|| अरे माणसा माणसा|माझ्या जीवाचा मैतरं||आहे मोठा जादूगार|त्यांवर माझी मदार||४|| अरे माणसा…

कार्यातून तळपणारा ‘भास्कर’!

Bhaskar Ghule Birthday Article

विविध पुरस्कारांनी गौरवलेला आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध सहकारी साखर कारखाना म्हणजे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना…. या कारखान्याचे अष्टपैलू कार्यकारी संचालक अर्थात एमडी श्री. भास्करराव घुले यांचा 1 जानेवारी रोजी वाढदिवस. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात, पण घुले यांना खडतर आव्हाने पेलणे…

Select Language »