मुख्य बातम्या

पश्चिम महाराष्ट्र

RAJU SHETTI

आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव आणणार- राजू शेट्टी 

Jan 6, 20262 min read

सातारा : ऊसतोडीनंतर पंधरा दिवसांत पेमेंट न करणाऱ्या साखर कारखान्यांना आयुक्तांना भेटून आरआरसी सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खमकी माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्यासाठी स्वाभिमानी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा येथे शासकीय विश्रामगृहात, आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजू शेळके व पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवणार आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस पडला. हा पैसा संबंधित नेत्यांनी रोजगार हमीवर जाऊन मिळवला नाही. भ्रष्ट मार्गाने मिळवलेला काळा पैसाच निवडणुकीत बाहेर येतो. आम्हाला या साठमारीत पडायचे नाही. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे पावित्र  डागाळायचे नाही. मात्र, आज स्थानिक स्वराज्य संस्था कोणासाठी आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात काळ्या पैशांचा अमर्याद वापर वाढला आहे. काळ्या पैशांपाठोपाठ गुंडागर्दी येते. एका हातात दंडुका आणि एका हातात नोटांची थप्प्या घेऊन निवडणुका मॅनेज होत आहेत. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेण्याची गरज आहे. हा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. त्यांनी चोरांच्या पायात पत्र्या ठोकल्या. आज पत्र्या ठोकण्याची गरज नाही, सातारकरांनी मतपेटीतून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

मराठवाडा

WISMA executive committee meeting

नॅचरल शुगरला WISMA चा सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार

Aug 16, 20252 min read

श्रीनाथ म्हस्कोबा कारखाना ऊस विकासात नंबर वन्‌ पुणे : महाराष्ट्रातील खासगी क्षेत्रातील १३३ साखर कारखान्यांचे शिखर संघटन असलेल्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (WISMA) पुरस्कार शनिवारी जाहीर झाले. नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि. ला…

विदर्भ

Sameer Salgar, MD, Hutatma kisan ahir sugar

एमडी पॅनल परीक्षा : वाद आणि उपाय

Jul 17, 20247 min read

महाराष्ट्रात साखर कारखानदारी स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच 1918 पासून सुरू होऊन 1930 ते 32 पासून जोर धरू लागली होती. त्याकाळी चितळे समूह, आगाशे, माळीनगर, न्यू फलटण, बेलापूर शुगर, कोल्हापूर शुगर, वालचंद नगर शुगर, सोमय्या शुगर, निरा व्हॅली…

मार्केट

हॉट न्यूज

sugarcane control order 2026 is coming

‘Sugarcane Control Order 2026’ : शेतकरी, कारखानदार, इथेनॉल उत्पादकांवर काय परिणाम होणार?

सविस्तर माहिती जाणून घ्या नवी दिल्ली — केंद्र सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (Department of Food & Public Distribution) तब्बल 60 वर्षे जुना ऊस नियंत्रण आदेश 1966 (Sugarcane Control Order, 1966) रद्द करून त्याजागी नवा ‘Sugarcane Control Order, 2026’…

आजचा दिवस

Articles/News (English Section)
Mangesh Titkare being felicitated by Prashant Paricharak

साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे यांचा मोलाचा सल्ला

पंढरपूर: “साखर कारखानदारी सध्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. केवळ गाळप क्षमता वाढवण्याच्या ‘रॅट रेस’मध्ये न पडता, आता तंत्रज्ञानाची जोड…

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ…
Select Language »